आपला महाराष्ट्रठळक बातम्या

Manoj Jarange : अखेर भगवं वादळं मुंबईत धडकणार ! सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची (Manoj Jarange) राज्य सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. मनोज जरांगे हे मुंबईत जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. आरक्षणावर तोडगा नाहीच. त्यामुळे आता सरकारी यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांना हायकोर्ट आणि आझाद मैदान पोलिसांनी मुंबईत न येण्याबद्दल नोटीस बजावली आहे.