MAHARASHTRA RAIN: राज्यात मॉन्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि कोकणातील
अनेक भागांत पावसाने रविवारी संध्याकाळपासूनच चांगलाच जोर धरला.
हवामान विभागाने 22 जिल्ह्यांना यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट दिला असून
काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे
तर धरणांच्या पाणी पातळीबाबतही दिलासादायक माहिती समोर आली.
अनेक प्रमुख धरणांत समाधानकारक साठा असून मुंबईपासून कोकण, विदर्भ,
पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाने (MAHARASHTRA RAIN) अखेर जोर पकडला असून रविवारी संध्याकाळपासूनच मुंबई, ठाणे, कल्याण, वसई-विरार परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हवामान विभागाने रायगडसाठी ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये पावसाने घातले थैमान
ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, आहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला.
तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
धरणांच्या पातळीबाबत बोलायचं झालं, तर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या समाधानकारक साठा आहे.
HEAVY RAIN : पुन्हा जोरदार पाऊस, पुन्हा रस्त्यांचे झाले ओढे, पुणे तिथे काय उणे… PHOTO
विहार ३२.५७%, मोडकसागर २६.१२%, तुलसी २८.९०% भरले आहे.पुणे विभागातील खडकवासला धरण ४६.९७% भरले
असून मुळशी, पवना, वीर, पानशेत आणि चासकमान धरणांमध्ये १३ ते ४५% पाणी साठा आहे.
कोकणातील गडनदी धरणात ६५.८५%, तर सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरमधील अनेक धरणात ३०-६६% पाणीसाठा आहे.
मराठवाड्यात मात्र काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. येलदरी, तेरणा, मांजरा धरणांत काही प्रमाणात साठा असून, काही धरणं अजूनही अर्धवट भरलेली आहेत.
नागपूर विभागात तोतलाडोह धरण ५१.७९% भरलेलं असलं तरी काही धरणं पूर्ण रिकामी असल्याने विदर्भात अजूनही जोरदार पावसाची गरज आहे.