Maharashtra Rain Alert : राज्यातील 5 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट ; राज्यभरातील पावसाचा आढावा

79 0

Maharashtra Rain Alert : गुरुवारी राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातही पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान आज सकाळपासून पुण्यामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र आज राज्यभरामध्ये कशाप्रकारे वातावरण असेल, राज्यभरात पावसाची काय स्थिती आहे (Maharashtra Rain Alert) चला जाणून घेऊया…

भारतीय हवामान विभागाने दिलेला माहितीनुसार पुढच्या 24 तासात राज्याच्या विविध (Maharashtra Rain Alert) भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढच्या 24 तासात मुंबईसह, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह, पुण्यातील घाट परिसर, सातारा घाट परिसर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Palkhi Procession Pune Traffic Changes :पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यात वाहतूकीत बदल, काय आहेत पर्यायी मार्ग ?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 19 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. कोकणात अति मुसळधार पाऊस कोसळलाय, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस नोंदवला गेला आहे. मुंबई आणि ठाण्यात गेल्या 24 तासात 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून मध्य महाराष्ट्रात मे महिन्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला पण विदर्भात अद्याप मान्सूननं पूर्णपणे जोर धरलेला नाही.

हवामान खात्याने 20 ते 22 जून पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड रत्नागिरी,सातारा आणि पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून विदर्भात 23 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील खडकवासला आणि जाधववाडी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

राज्यात मागील 24 तासांमध्ये मुंबई शहर जिल्ह्यात 142.06 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात 134.1 मिमी, पालघर 120.09 मिमी, ठाणे 90.03 मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात 60.05 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ठाणे 90.03 रायगड 134.1, रत्नागिरी 60.09, सिंधुदुर्ग 9.4, पालघर120.9, नाशिक 40.03, धुळे 25.5, नंदुरबार 33.4, जळगाव 4.7, अहिल्यानगर 8.7 पुणे 29.3, सोलापूर 0.3, सातारा 17.07, सांगली, कोल्हापूर12.1, छत्रपती संभाजीनगर 4.5, जालना 2.1, बीड 0.2, धाराशिव 0.2, नांदेड 0.6, परभणी 0.5, हिंगोली 0.8, बुलढाणा 3.1, अकोला 8.6, वाशिम 1.7 अमरावती 5.9, यवतमाळ 1.2, वर्धा 3.2, नागपूर 0.7, भंडारा 0.3,चंद्रपूर 4.3 आणि गडचिरोली जिल्ह्यात 0.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

*TOP NEWS MARATHI : पुण्यात धावत्या बसमध्ये शिरलं पाणी, पुण्यातल्या Water Bus चा व्हिडीओ व्हायरल

एकूणच राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी चांगला फायदा झाला आहे. मात्र दुसरीकडे विदर्भातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यभरातल्या ताज्या अपडेट साठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र! आपली बातमी!

Share This News
error: Content is protected !!