स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महिला दिनाच्या शुभेच्छा

139 0

महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे.

महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करुया. स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील स्त्रीशक्तीचा गौरव करुन राज्यातील जनतेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील माता-भगिनींना, स्त्रीशक्तीला वंदन केलं असून समाजनिर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्रानं सुरुवातीपासूनंच स्त्रीशक्तीचं महत्वं ओळखून त्यांना संधी देण्याचं काम केलं. राज्यातील स्त्रीशक्तीनंही संधींचं सोनं करत बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं.

 

राजमाता जिजाऊं माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रयतेचं राज्य, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरु करुन महिलांना स्त्रीशिक्षणाची दारं खुली करुन दिली. महाराणी ताराबाईंनी आपल्या शौर्यानं इतिहास घडवला, त्या इतिहासानं अनेकांना प्रेरणा दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात भारतरत्न लतादीदी त्यांच्या स्वरसामर्थ्यामुळे स्वरसम्राज्ञी ठरल्या. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी भारतीय लष्कराचं नेतृत्वं केलं. तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार साहेबांनी महिलांसाठी सैन्यदलांची दारं खुली केल्यानं आज अनेक महिला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत.

महाराष्ट्रानंही वेळोवेळी महिला धोरण लागू करुन राज्यातील महिला शक्तीला विकासाची संधी दिली. नोकरीत, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल्यानं अनेक माता-भगिनी राजकारण, समाजकारणात आता सक्रीय झाल्या आहेत. उद्योगजगतात जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत.

निर्णयप्रक्रियेत त्यांचं योगदान महत्वाचं ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात माझ्या शासकीय गाडीचं सारथ्यं स्थानिक पोलिस दलातील तृप्तीताई मुळीक या पोलिस भगिनीनं केलं होतं. राज्याच्या घराघरातली, गावखेड्यातली स्त्रीशक्ती ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे.

या स्त्रीशक्तीला अधिक सक्षम, समर्थ, स्वावलंबी करुन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

Share This News

Related Post

राज्यातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

Posted by - April 20, 2022 0
राज्यातील 11 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 11 पोलीस उपायुक्त , पोलीस अधीक्षक यांची पोलीस उप…
Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या 2 तासांचा ब्लॉक; वाहतूक पूर्णत: राहणार बंद

Posted by - November 20, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे…

संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी, शिवसेनेकडून अधिकृत घोषणा ! कोण आहेत संजय पवार ?

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- अखेर राज्यसभेसाठी शिवसेनेकडून सहावा उमेदवार म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे…

अखेर…. सस्पेन्स संपला; एमआयएमची दोन मतं महाविकास आघाडी बरोबर

Posted by - June 10, 2022 0
राज्यसभा निवडणुकीसाठी  मतदानाला आता सुरुवात झाली असून ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे. इम्तियाज…

स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीनं राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन

Posted by - June 11, 2023 0
स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीनं राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून या संमेलनात देशभरातील तब्बल 4500 आमदारांचा सहभाग राहणार असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *