LATUR RAKSHABANDHAN SPECIAL: मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी दोन्ही घरचा दिवा अशी म्हण प्रचलित आहे…
तरी देखील राज्यात मुलगी झाली म्हणून
रस्त्यावर फेकून देण्यात आल्याच्या घटना घडतायत…
मात्र लातूर जिल्ह्यातल्या शिवणी गावात राहणाऱ्या भारतबाई कांबळे
अपघातानंतर पत्नीनं साथ सोडली अन् बहिण भावाच्या मदतीला धावली
या महिलेन दोन्ही घरचा दिवा होऊन दोन्ही कुटुंबाना आधार तर दिलाच शिवाय
अपंग भावाचा 25 वर्षे सांभाळ केलाय…
आणि बहिण -भावाच्या नात्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवलाय.
पाहुयात या वरचा मराठीचा स्पेशल रिपोर्ट (LATUR RAKSHABANDHAN SPECIAL)
या आहेत औसा तालुक्यातल्या शिवणी गावच्या भारतबाई कांबळे…
घरची परिस्थिती जेमतेमच…
उदारनिर्व्हासाठी शेती नसल्याने भारातबाई दुसऱ्याच्या
शेतीवर मजुरी करून घर प्रपंच भागवतात…
वडिलांच्या मृत्यू नंतर भारतबाई अपघातातून अपंगत्व
आलेल्या भावाची गेली 25 वर्षे सांभाळ करतायत..
. एका अपघातात विष्णू यांना अपंगत्व आलं…
भारतबाईचा भाऊ विष्णू बनसोडे हा
गेल्या 25 वर्षांपासून याच अवस्थेत आहे…
तो पलंगावरून उठूहि शकत नाही…
जेवण , अंघोळी करू शकत नाही…
एका अपघातात त्याला कायमचे अपंगत्व आल्यानंतर त्याची
पत्नी चक्क विष्णूच्या अंगावर मंगळसूत्र फेकून देऊन त्याला कायमची सोडून निघून गेली…
तेंव्हा पासून विष्णूचा बहीणच आई , वडील,आणि प्रसंगी देवाच्याही रुपात सांभाळते.
PUNE VIMANNAGAR PUB BIRTHDAY VIDEO:भाई का बर्थडे”; पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून पबच्या पार्किंगमध्येच शंभरहून अधिक गुंडांची ‘डीजे पार्टी’
घरात तिन्ही विश्वाचं दारिद्र्य आणि मजुरी शिवाय इतर कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने
भारतबाई इच्छा असूनही विष्णूचा मोठ्या दवाखान्यात उपचार करू शकत नाहीत…
घरची हलाकीची परिस्थिती लक्षात घेता अनेक सेवाभावी संस्थाना मदतही मागितली…
मात्र कुठूनही मदतीचा हात पुढे आला नाही… विष्णूलाही बहिणीच्या कष्टाची जाणीव आहे .
मात्र तो नियतीपुढ हतबल आहे… त्यामुळ बहिणीच्या कुठे तरी मी कामाला येईन का ?
असा भाबडा विचार करीत विष्णू आजही जगतोय…
ईच्छा असूनही बहिणीसाठी कांही करू शकत नसल्याच दुःख विष्णूच्या मनात आहे…
अंत्यत साध्या अपघातानंतर विष्णूच्या पाय आणि शरीराच्या अर्ध्या भागाला अपंगत्व आलाय ,
हे अपंगत्व नाहीसं होऊही शकत, मात्र त्यासाठी आवश्यकता होती मोठ्या रकमेची …
जी भारतबाईकडे नव्हती…. त्यामुळ हा भाऊ या बहिणीला रक्षा बंधन दिनी काहीही ओवाळणी देऊ शकत नाहीय
तर हि बहिणही हतबल झालीय….
गावातले लोकं मात्र या अनोख्या बहीण भावाच्या बंधनाला अश्रू वाहून दरवर्षी शुभेच्छा देतात…
भावासाठी रक्षणाची जबाबदारी निभावणं म्हणजेच रक्षाबंधन…
पण लातूरच्या भारतबाई कांबळे यांनी ही परंपरा वेगळ्या पद्धतीने जपली आहे…
पत्नीने साथ सोडलेल्या अपंग भावाचा 25 वर्षे सांभाळ करत..
त्यांनी केवळ बहिणीचं नव्हे तर आई-वडिलांचंही कर्तव्य पार पाडलं.
ही घटना समाजाला नात्यांचं खरं