जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत, त्यांनी सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये त्यांनी 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत.
काय आहेत त्या मागण्या ?
अंतरवाली सराटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. वीस तारखेच्या आत सरकारनं निर्णय घ्यावा, अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरे असं दोन्ही बाजूनं आरक्षण मिळावं अश्या मागण्या जरांगे पाटलांनी केल्या आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन; पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
Rahul Shewale : ‘ती चूक आम्ही करणार नाही’; राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Ashok Chavan : ‘…म्हणून मला भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली’; अशोक चव्हाणांनी केले स्पष्ट