राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज

269 0

जुलै महिन्यात पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली काहीशी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

येत्या तीन चार दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार असून रविवारी पावसाचा जोर वाढणार आहे.चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भातील बाकीचे जिल्हे वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोवा येथे बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने आपली हजेरी लावली.आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणांवर पावसाचा अंदाज आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!