अखेर…राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

922 0

मुंबई: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर अठरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र या मंत्रांचा खातेवाटप जाहीर न झाल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत होती. 

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

इतर 18 मंत्र्यांची खाती

  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ. विजयकुमार गावित-आदिवासी विकास
  • गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 
  •  दादा भुसे-बंदरे व खनिकर्म 
  • संजय राठोड-अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे- कामगार
  •  संदीपान भुमरे-
  • रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत- उद्योग
  •  प्रा.तानाजी सावंत-
  •  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण –
  • सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार-
  • कृषी
  • दीपक केसरकर-
  • शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे-
  •  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई-
  •  राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा-
  •  पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!