सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

299 0

सांगली: सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली.

सांगलीतील आष्टा येथील हा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला आहे. यावेळी परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं. शिवप्रेमींनी गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरती करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

मंगळवारी या संपूर्ण परिसरातील वीज खंडीत करण्यात आली होती. रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेतलं आहे.या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांत आहे. भाजपचे नेते निशिकांत पाटील यांच्यासह शिवप्रेमींना ताब्यात घेण्यात आले आहे. आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

Share This News
error: Content is protected !!