महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांचे आज 28 जानेवारी 2026 सकाळी बारामतीत (BARAMATI) झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून(MUMBAI) चार्टर विमानाने बारामतीकडे निघाले होते. लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात होऊन स्फोट झाला आणि आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह(AJIT PAWAR) विमानातील इतर 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुरक्षा अधिकारी, एक सहकारी तसेच पायलट आणि सह-पायलट यांचा समावेश आहे.
अपघातानंतर विमान कंपनीवर तांत्रिक बिघाडाचे आरोप होऊ लागल्यानंतर, दिल्लीस्थित व्हीएसआर एव्हिएशन (VSR Aviation / VSR Ventures) चे मालक व संचालक विजय कुमार सिंह यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, अपघातग्रस्त Learjet 45 नोंदणी क्रमांक VT-SSK हे विमान उड्डाणापूर्वी सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण करूनच रवाना झाले होते आणि तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम होते.
सिंह यांनी प्राथमिक माहितीनुसार हवामानाचा मुद्दा उपस्थित केला. लँडिंगच्या वेळी बारामती परिसरात दृश्यता कमी होती, धुके किंवा प्रतिकूल हवामानामुळे रनवे स्पष्ट दिसला नसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दोन्ही वैमानिक अनुभवी होते; मुख्य पायलटकडे 16 हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, केंद्र सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून DGCA आणि Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि अन्य तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, अजित पवार(AJIT PAWAR)यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.