शिंदे भाजपा सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नाव देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. मात्र, केंद्राकडून मंजुरी मिळण्याच्या आदीच गुगल मॅपवर औरंगाबादला ‘संभाजीनगर आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’ असं नाव देण्यात आलं होतं. केंद्राच्या मंजुरीपूर्वीच गुगलकडून असे बदल करण्यात आल्याने मोठ्याप्रमाणात विरोध झाला.
गुगल मॅपवर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाल्याचं दिसतं होतं, त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं होतं.
गुगलनं काही दिवसांसाठी हे नाव का बदललं होतं आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या मान्यतेआधीच गुगल मॅपनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव हे धाराशिव असा उल्लेख गुगल मॅपमध्ये केला होता. त्यामुळं औरंगाबादेत नव्या वादाला सुरूवात झाली होती. या गुगल मॅपच्या निर्णयाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत थेट गुगलला टॅग करत जाब विचारला होता. गुगलवर औरंगाबाद सर्च केलं तर आपोआप संभाजीनगर आणि उस्मानाबाद सर्च केलं तर धाराशिव असा रिझल्ट येत होता. त्यानंतर आता गुगलनं सदर निर्णय बदलला आहे. आता गुगल मॅपमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद असं नाव दाखवण्यात येत आहे.