मुंबईत बुधवारी रात्री उशिरा एका हल्लेखोराने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोरीच्या प्रयत्नादरम्यान त्याच्यावर चाकूने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तातडीने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यानंतर तातडीने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरी पोहोचले. आणि याच अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांचाही समावेश होता. गुंडांना धडकी भरवणारे 90 च्या दशकात 80 हून अधिक गुंडांचा एन्काऊंटर करणारे दया नायक नेमके कोण
दया नायक यांचं नाव मुंबईतील अंडरवर्ल्ड गुंडांच्या विरोधात केलेल्या अनेक कारवायांमुळे चर्चेत आले होते. 1990 च्या दशकात त्यांनी 80 हून अधिक गुंडांचा एन्काऊंटर केला. मुंबईतील गुन्हेगारांमध्ये दया नायक हे नाव दहशतीचा कर्दनकाळ म्हणून घेतलं जातं. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका कोकणी भाषिक कुटुंबात जन्म झाला. नायक यांचे शालेय शिक्षण कन्नड माध्यमाच्या शाळेतून झाले.
वडील सोडून गेले. आई राधा हिला तीन मुलं आणि एक मुलगी होती. आई माहेरी राहायला गेली. आणि माहेरच्या एका जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहू लागली.
इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दया नायक हे कुटुंबाला मदत करण्यासाठी 1979 मध्ये मुंबईत आले. उडपीतल्या छोट्याशा गावातून आलेला हा मुलगा मुंबईच्या वर्सोवा भागातला एका बारमध्ये वेटरच काम करू लागला.
वर्सोवा भागातल्या बारमध्ये दया वेटर म्हणून काम करू लागला त्याबद्दल त्याला महिन्याला पाचशे रुपये पगार मिळत होता आणि त्याचबरोबर त्याला पाचशे रुपये टीप देखील मिळायची. 1980 सालात हजार रुपये मिळवणारा हा लहान मुलगा दया यातले निम्मे पैसे आपल्या आईला पाठवायचा आणि घराची परिस्थितीही सुधारू लागली.आणि राहिलेल्या पैशातून हा लहानसा दया शिक्षणाची स्वप्न बघायचा. हा बार मालक शहाणा होता त्याने दयाचा अभ्यास बघितला. आणि दयाला नाईट स्कूलमध्ये ऍडमिशन करून दिलं. आता बार मालकाच्या आशीर्वादाने दया शाळा शिकू लागला आणि त्याचबरोबर त्याने त्याचा दहावी आणि बारावीचे शिक्षणही पूर्ण केलं. आईला मुलगा कमवतोय याबरोबरच तो शिकतोय याचाही आनंद वाटू लागला. वेटर बरोबरच दयाने प्लंबरचही काम केलं. याबरोबरच त्याने MSC चे शिक्षण देखील पूर्ण केलं. अशाच एका रात्री त्यांनं ठरवलं पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरायचा. या परीक्षेची संपूर्ण माहिती दयाने मित्रांकडून घेतली. आणि दया पोलीस होण्याचं स्वप्न बघू लागला. वेटर आणि प्लंबर अशी काम सोडून दया दादर मधील एका अभ्यासिकेत कामाला लागला. या अभ्यासिकेत दया काम करत करत अभ्यासही करू लागला. बघता बघता दयाने पीएसआय ची पोस्ट काढली. पहिलीच पोस्टिंग त्याची जुहूतल्या डीटेशन्स विंगमध्ये झाली.दया नायक वरील वेटरचा शिक्का जावून त्याच्या अंगावर खाकी वर्दी आली. त्या वर्दीवर नेमप्लेट असायची,सब इन्स्पेक्टर दया नायक.
आज त्या नावात वाटणारी, दहशत तेव्हा नव्हती. तो नव्यानं दाखल झालेला एक पोलिस सब इन्स्पेक्टरच होता. शांतपणे तो नोकरी करत होता, पण अचानक एक दिवशी त्याच्या आयुष्यात, तो प्रसंग आला..
त्याच्या समोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभे होते. त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्यांच्यावर तुटून पडला. छोटा राजनच्या टोळीतील गुंडावर हात टाकण्याचं धाडस एका पोलिस सब इन्स्पेक्टरने केलं होतं.
एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांच लक्ष त्याच्याकडे गेलं. हा कोण? याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलिस कमिश्नर सत्यपाल सिंह यांच्या कानावर गेली. सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानगी CIU ब्रॅन्चमध्ये म्हणजेच CRIME INVESTIGATION UNIT केली. तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदिप शर्मा.
1996 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन गुंड अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टिप प्रदिप शर्मांना मिळाली होती. त्याच चकमकीत दया नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या. आणि या दोन्ही गुंडांचा खात्मा दया नायक यांनी केला. पण यांचं घटनेमुळे एका सब इन्स्पेक्टर एकांन्टर स्पेशॅलिस्ट बनला.इन्स्पेक्टर प्रदिप शर्मांना अस्सल ज्युनियर मिळाला होता. त्याला मरायची भिती वाटतं नव्हती. तो फक्त मारायच्या गोष्टी करायचां. रफीक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडत गेलं. आत्ता दया नायक हे नाव साधं राहिलं नव्हतं. दयाच्या नावाने आत्ता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत निर्माण झाली होती.
सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं. सादिक शार्पशुटर होता. दोन्ही हातानं एका वेगात बंदुक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता. 26 डिसेंबर 1996 दिवशी सादिक आणि दया नायकची कुस्ती संपुर्ण दादरच्या फुल मार्केटला पहायला मिळाली होती.
दादरच्या मार्केटमधून जात असतानाच सादिक दया नायकच्या रडारवर आला. पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नायकने सादिकवर हात टाकला. सादिक आणि दयाची मारामारी सुरू झाली. आत्ता दया नायक भर चौकात मारला जाणार अशी चर्चा सुरू झाली. अचानक एक गोळी आली आणि दया नायकच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
आणि दया नायकाच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या अन सादिक आडवा झाला. दया नायकने दादरच्या गर्दीत सादिकचा गेम केला. दया नायकच्या नावावर 80 हून अधिक एन्कांन्टर जमा झाले होते. अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉंम्ब ठेवण्यात आला. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रितीने दया नायक यातून वाचला. महिनाभर तो हॉस्पीटलमध्ये होता.
आत्ता दया नायकला सिनेमाहून अधिक फेम मिळू लागलं.
संपुर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडे गेलं. खंडण्यांचा धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे नाव हिरोहून कमी नव्हतं. फेम नावाचा प्रकार दया नायकच्या नावासोबत जोडला जावू लागलां.
अशातच दया नायकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र टेबलांवर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्व कळणं साहजिक होतं. पण याच शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे वासे फिरू लागले.
बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठ्ठ मोठ्ठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते. दया नायक एन्कांटर स्पेशॅलिस्ट असला तरी तो एक सब इन्प्सेक्टर होता. त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न जुळणार होतं. त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला, पण त्यातूनही तो सहिसलामत सुटला. दया नायकच्या संपत्तीवरती चर्चा करणारे शांत झाले होते.
पण दया नायकच्या तक्रारींचा पाढा वाढतच होता.त्याच्या संपत्तीबद्दलचा संशय दर वेळी वाढवणारी उदाहरणे दिसतं होती. शेवटी एंन्टी करप्शन ब्रॅन्चने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला. 2006 साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली. दोन महिने एन्कांटर स्पेशॅलिस्ट दया नायक जेलमध्ये होते. मिडीयाच्या नजरेतून हे बातमीमुल्य होतं.दया नायक जेलमध्ये हि बातमी टिआरपी वाढवणारी होती. पण त्यामुळे दया नायक कडे बघणारी नजर बदलली. त्याने केलेल्या एन्कांन्टवर संशय घेण्याच काम घेण्याच काम देखील करण्यात आलं.
तब्बल पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं.
यात 2009 मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली. तेव्हा डिजीपी एस.एस.विर्क यांनी त्या गोष्टीला नकार दिला.
इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोधच होता. 2010 साली सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले. दया नायक पुन्हा नोकरीवर रुजू झाले. इतक्या काळानंतर देखील दया नायक एक पोलिस सब इन्प्सेक्टरच होते.2018 साली त्याचं प्रमोशन झालं होतं. आत्ताही ते मुंबई पोलिसमध्येच आहेत. ते हि पोलीस इन्प्सेक्टर म्हणून. पण आजही त्याच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ल्ड असेलच. पण आता सैफ अली खान वरील झालेल्या हल्यानंतर पुन्हा एकदा दया नायक चर्चेत आलेत. सैफ अली खान वरील हल्ल्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपासून दया नायक यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.