केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळासह संसदेतही उमटले. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करून डोळे मेणबत्तीने जाळून काढले, फोडले अशा चर्चा त्यांच्या हत्येनंतर पसरल्या होत्या. आता संतोष देशमुख यांच्या हत्येचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला असून, पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्यांची हत्या नेमके कोणत्या कारणाने झाले हे स्पष्ट झाले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदारांना एक बॉडीगार्ड आणि वाल्मीक कराड यांना दोन बॉडीगार्ड कसे? असा सहभाग विधानसभेत उपस्थित करत वाल्मीक कराड आणि या प्रकरणातील आरोपींचे सीडीआर रिपोर्ट तपासा अशी सरकारकडं मागणी केली. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली. तर सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ ही हत्या किती क्रूरपणे केली याची माहिती सभागृहाला दिली. सरपंच देशमुख यांच्या अंगावर मारहाण झालेले काही कथित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक झाले.देशमुख यांच्या छातीवर, पाठ, हात, पाय, चेहरा, डाेके यावर मुकामार होता. चेहऱ्यावर आणि त्यातही डोळ्यावर मारहाण झाल्याने खालचा व वरील भाग काळा-निळा झाला होता. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करून डोळे मेणबत्तीने जाळून काढले, फोडले अशा चर्चा त्यांच्या हत्येनंतर पसरल्या होत्या. काय हत्त्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला.
9डिसेंबरला हत्या झाल्यानंतर समर्थकांसह नातेवाइकांनी आंदोलन केले. त्यामुळे 10 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता शवविच्छेदन करण्यास सुरुवात झाली. साधारण तासभर ही प्रक्रिया चालली. डॉ.समाधान घुगे, डॉ.सुलतान हुसेन आणि डॉ.सचिन राऊत या तीन डॉक्टरांच्या समितीने शवविच्छेदन व अहवाल देण्याची प्रक्रिया पार पाडली. आता याचा व्हिसेरा राखीव ठेवला असून, त्याचा अहवाल येण्यास साधारण दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. परंतु या हत्येचं कारण समोर आलंय. संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण ‘हॅमरेज ॲण्ड शॉक ड्यू टू मल्टीपल इंन्ज्युरिज’ असे नमूद केले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार अनेक ठिकाणी मारहाण झाल्यामुळे रुग्ण शॉकमध्ये गेला आणि मृत्यू झाला, असा याचा अर्थ होतो.आठ पानांचा हा अहवाल मंगळवारी सीआयडीकडे आरोग्य विभागाने सुपुर्द केला आहे.या प्रकरणात जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे,विष्णू चाटे, अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुलेला यापूर्वीच अटक केली होती. यातील चौथा आरोपी विष्णू चाटे याला बुधवारी सकाळी बीड शहराजवळ ताब्यात घेतलं तर अजून या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत.