होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जीवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने सागर कदम याला जीवे मारण्यासाठी मयुरी दांडगे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांचे सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून समोर आलय या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे. आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि चंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.