Sandhya Pathak Death Mystery : साठे कॉलेजच्या संध्या पाठकची हत्या की आत्महत्या ? वाचा स्पेशल रिपोर्ट

71 0

Sandhya Pathak Death Mystery : कॉलेजमध्ये शिकणारी एक हुशार विद्यार्थीनी, लेखन वाचनाची आवड असणारी एक विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरून निघते. मात्र कॉलेजमध्ये पोहोचताच तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू होतो. पण हा मृत्यू नेमका कशामुळे ? हाच प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय. या विद्यार्थिनीचं नाव संध्या पाठक.. संध्या तिसऱ्या मजल्यावरून पडली की तिला कोणीतरी पाडलं ? या प्रकरणाचा तपास सुरू असला तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पाहूया यावरचाच (Sandhya Pathak Death Mystery) हा स्पेशल रिपोर्ट..

Malegaon Sugar Factory Politics : माळेगाव साखर कारखान्याचं राजकारण तापलं; PDCC बँकत मध्यरात्री काय घडलं?

संध्या पाठक ही तरुणी मुंबईतील विलेपार्ले येथील साठे कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती तिसऱ्या वर्षात शिकत होती नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरून निघाली होती. कॉलेजच्या कॉरिडोर मधून अगदी शांतपणे चालताना दिसून आली. मात्र पुढच्या काही मिनिटात ती तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यापूर्वीच अति रक्तस्त्रावामुळे त्याचा (Sandhya Pathak Death Mystery) मृत्यू झाला होता. संध्याचा तिसऱ्या मजलावरून कोसळल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं. सुरुवातीला संध्या चुकून पडली असेल असा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र नंतर संध्या पडली नसून तिने स्वतः उडी मारली अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपासाही सुरू केला. मात्र याच तपासात अनेक लिंक्स मिसिंग आहेत. त्याचबरोबर संध्याने लिहिलेल्या एका पुस्तकामुळे संध्या पाठक मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. संध्याच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांना कळविल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आमची संध्या आत्महत्या करूच शकत नाही. मृत्यूच्या पूर्वी ती अगदी नॉर्मल होती. नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली. कॉरिडोर मधून शांतपणे चालतानाही दिसली. मग अचानक ती आत्महत्या का करेल ? आणि जर तिने आत्महत्या केली असती तर त्याविषयी कुणालाच काहीच माहिती कशी काय नाही ? सुसाईड नोट देखील सापडली नाही ? त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आलाय.

दुसरीकडे सध्याच्या मृत्यूचा संबंध तिने लिहिलेल्या एका पुस्तकाशी जोडला जातोय. संध्याने ‘World’s Best Ex Bestfriend’ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. यामध्ये एकूण नऊ प्रकरणं आहेत. या पुस्तकात दोन जिवलग मित्रांच्या वेगळेपणाची कथा मांडली आहे. सोबतच एकटेपणाची भावना देखील शब्दबद्ध केली आहे. त्यामुळे हे पुस्तक तिच्या स्वतःच्या मानसिक स्थितीचा आढावा देत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ती स्वतः मानसिक रित्या खचलेली असू शकते त्यामुळेच तिने हे पुस्तकही लिहिलं आणि त्यानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असेल, असं म्हटलं जातंय. त्यामुळे आता पोलीस केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांचा नाही तरी या पुस्तकाचाही रेफरन्स घेऊन तपास करत आहेत.

TOP NEWS MARATHI PUNE GOKHALENAGAR CCTV पुण्यात रिक्षाचालकाने महिलेला दिली धडक

कॉलेजच्या कॉरिडोरमधून निवांतपणे जाताना दिसणारी संध्या पाठक अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी का मारेल ? जर तिला आत्महत्याच करायची होती तर तिने कॉलेजची निवड का गेली ? जर ती मानसिक रित्या खचलेली होती तर तिच्या जवळच्या मैत्रिणींना कुटुंबीयांना याविषयी काहीच माहिती कशी नव्हती ? आणि जर तिने आत्महत्या केली नाही तर तिला खरंच कोणी तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं का ? दिल असेल तर कुणी आणि का ? या सगळ्या प्रश्नांबरोबरच हे प्रकरण जेवढं गंभीर दिसतंय तसंच आहे की मग हा केवळ अपघात आहे ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ज्याचा शोध पोलीस तपासातून लागणं गरजेचं आहे.

Share This News
error: Content is protected !!