परभणी : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून समोर आली आहे. यामध्ये देवदर्शन करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 भाविक जखमी झाले आहेत. पाथरी तालुक्यातील वडी पाटीवरील या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि भाविकांच्या गाडीला समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती का भाविकांच्या कारचा पूर्ण चक्काचुर झाला आहे. यात तिघे जागीच ठार झाले आहेत तर, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व भाविक जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथील रहिवासी असून मानवत तालुक्यातील येशेवाडी येथे देव दर्शनासाठी आले होते. देव दर्शन करुन गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता कि, या अपघातात दोन्ही वाहनांच्या मध्ये क्रूझर गाडी फसली होती, या गाडीला दोन जेसीबीच्या मदतीने बाजूला काढण्यात आले. यावरून तुम्ही अपघाताचा अंदाज लावू शकता. या विचित्र अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. परभणी पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार
Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ
Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…