Madarsa Murder Case Maharashtra : शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय? असं बालगीत सर्वांनाच परिचित आहे. लहान मुलांना अनेकदा शाळेला जायची इच्छा नसते. पण एका धार्मिक शिक्षण संस्थेला सुटी मिळेल आणि आपल्याला घरी जाता येईल याच मानसिकतेतून एका अल्पवयीन मुलाकडून 11 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. खेळण्या,बागडण्याच्या, शिकण्याच्या वयात (Madarsa Murder Case Maharashtra) एका मुलाच्या हातून हत्या घडली. नक्की काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊया…
महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मदरशात एक धक्कादायक घटना समोर आलीये… फैजान नजीम असं या मृत 11 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. आळते येथील मदरशात ही मुलं शिक्षण घेत होती. फैजानच्या सोबत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्यानेच सुटी मिळेल आणि आपल्याला घरी जायला मिळेल या कारणास्तव हा सगळा प्रकार केल्याचं उघड झालंय…
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही विद्यार्थी हे बिहारच्या ग्रामीण भागातले असून मदरशात ते एकाच खोलीत राहत होते. 15 जूनच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी विद्यार्थ्याने फैजांच्या तोंडात कापड कोंबले आणि त्यानंतर त्याच्या पायाजवळ विजेची तार बांधली आणि स्विच चालू केला. त्यानंतर तो स्वतः झोपी गेला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता जेव्हा विद्यार्थ्यांना नमाजसाठी उठवण्यात आलं तेव्हा फैजान मात्र मृत अवस्थेत आढळला.
त्यानंतर एकच खळबळ उडाली
त्यानंतर याबाबतची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तपासामध्ये मात्र धक्कादायक खुलासे समोर आले आणि फैजान सोबत राहणाऱ्या या अल्पवयीन मुलांना स्वतः गुन्हा कबूल केला. त्यांना सांगितलं की त्याला मदरसा बंद करायचा होता आणि त्याला सुटी हवी होती जेणेकरून त्याला घरी परत जाता येईल म्हणूनच हा भयानक प्रकार या अल्पवयीन विद्यार्थ्यांना केला सध्या पोलिसांच्या ताब्यात हा (Madarsa Murder Case Maharashtra) अल्पवयीन विद्यार्थी असून त्याला निरीक्षणगृहात पाठवण्यात आलं आहे.
*TOP NEWS MARATHI : ‘माळेगाव कारखाना निवडणूक’, बारामतीत मध्यरात्री ‘हाय-होल्टेज ड्रामा’; काय घडलं?
एका निष्पाप जीवाचा मृत्यू… आणि तो ही फक्त सुट्टी मिळावी म्हणून!
बालवयातल्या मेंदूत इतका प्रचंड ताण निर्माण होतोय की मुलं चुकीचा मार्ग निववत आहेत…
हा केवळ गुन्हा नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेवर, कौटुंबिक वातावरणावर आणि समाजाच्या मानसिकतेवर उठवलेला गंभीर प्रश्न आहे.
आपण सर्वांनीच याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे