Kolhapur Crime

Kolhapur Crime : पुरोगामी महाराष्ट्र हादरला ! वंशाच्या दिव्यापायी केला विवाहितेचा छळ; अन्…

605 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुली असल्याने आणि वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अस्मिता केदारी चौगले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असं विवाहितेचे नाव असून पती सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा पाहिजे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने सदर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. विवाहितेचे वडील दगडू सदाशिव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा 13 वर्षांपूर्वी केदारी यांच्याशी विवाह झाला होता. केदारी आणि अस्मिता यांना एक 9 आणि दुसरी 8 वर्षांची अशी दोन मुली आहेत. त्यामुळे मुलगा होत नसल्याने पती, सासू आणि सासऱ्याकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता.

या त्रासाला कंटाळून अस्मिताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना लक्षात येताच पतीने त्यांना तातडीने सीपीआर रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. यानंतर केदारी चौगलेचा पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!