हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli News) कळमनुरी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण गाव शिवारात ही घटना घडली आहे. यामध्ये (Hingoli News) पती पत्नीचा कौटुंबिक वाद 2 चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. आपल्या नवऱ्याबरोबर वाद झाल्यानंतर निर्दयी आईने रागाच्या भरात मुलांना धरणाच्या पाण्यात टाकून दिले. आपली आई आपल्या जीवावर उठेल याची कल्पनादेखील या मुलांना नव्हती. मुलांना पाण्यात टाकल्यानंतर त्यांच्या आईनेदेखील पाण्यात उडी घेतली.
काय घडले नेमके?
पती अमोल खंदारे व अमृपाली खंदारे असं या पती पत्नीचे नाव आहे. या दोघांमध्ये काही कौटुंबिक कारणामुळे वाद झाला होता. या वादाच्या रागातून निर्दयी आईने दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन ईसापुर धरण गाठले. त्या ठिकाणी तिने आपल्या मुलांसह धरणात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये मुलांच्या आईला वाचण्यात यश आले मात्र मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढत कळमनुरीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. रात्री उशीरा या दोन चिमुकल्यांवर जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. या चिमुकल्यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी
Nashik Crime : खळबळजनक ! नाशिकमधील चांदवडच्या तरुणाची दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ हत्या
ICC ची मोठी कारवाई! ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी