अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने 200 जणांना विषबाधा झाली आहे. जुलाब आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये एक हजार लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली असताना आता पुन्हा एकदा विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. नवरदेवाच्या घरी हा हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमानंतर जेवण ठेवण्यात आलं होतं. मात्र या जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाली. यातील अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विषबाधा झालेल्यांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?