हितेंद्र ठाकूरांची 35 वर्षांची सत्ता उलथवून लावणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत ?

Sneha Dubey: हितेंद्र ठाकूरांची 35 वर्षांची सत्ता उलथवून लावणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत ?

137 0

वसई विरार (vasai- virar vidhansabha) मध्ये हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) आणि बहुजन विकास आघाडीच्या 35 वर्षांच्या सत्तेला उलथवून लावणाऱ्या भाजपच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित(sneha Dubey) यांची राज्यभरात चर्चा आहे. कधीही न हरलेल्या ठाकूर यांना नवख्या स्नेहा दुबेंनी पराभवाची धूळ चारली. याच स्नेहा दुबे यांचा वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष मोठा आहे. त्यामुळे या स्नेहा दुबे नेमक्या कोण आहेत, वाचा सविस्तर .

दुबे यांचा परिचय 

स्नेहा दुबे पंडीत यांचा जन्म 1985 साली पालघर जिल्ह्यात वसईत झाला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि समाजसेवक विवेक पंडित यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतलं आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. दुर्गम भागातील महिलांसाठी बचत गट स्थापन करून महिला रोजगार निर्माण केले. कुपोषण मुक्त दुर्गम भागांसाठी अमृत आहार योजना राबवली. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभं केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. आणि भाजपने त्यांना हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात उमेदवारी दिली. मात्र याच ठाकूर आणि दुबे कुटुंबातील संघर्ष हा केवळ राजकीय नसून वैयक्तिक देखील आहे. हितेंद्र ठाकूर यांचे बंधू भाई ठाकूर हे गुंड होते. स्नेहा दुबे यांचे सासरे सुरेश दुबे यांच्याकडे एक मोक्याचा भूखंड होता. जो भाई ठाकूरला हवा होता. हा भूखंड मिळवण्यासाठी भाई ठाकूर ने सुरेश यांना दरडावलं, धमकावलं पण तरी सुरेश यांनी स्पष्ट नकार दिला. पुढे भाईने त्यांना धमक्या देणं सुरू केलं. याबाबत सुरेश यांची तक्रार घेण्यासही पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी सुरेश यांचं एकटं घराबाहेर जाणं बंद केलं. मात्र एके दिवशी नातेवाईकाबरोबर नालासोपारा स्टेशनवर थांबलेल्या सुरेश यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण स्नेहा दुबे यांचे वडील विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या मार्फत लावून धरलं. आणि याच काळात भाई ठाकूरचे बंधू हितेंद्र ठाकूर राजकारणात आले.

चुरशीची लढाई
हितेंद्र ठाकूर यांचं वसई विरार मध्ये मोठं वर्चस्व आहे. त्यामुळेच स्नेहा दुबे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या चुरशीची लढाई झाली. वसई विरारमध्ये गेली 35 वर्ष बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. हितेंद्र ठाकूर यांनी तब्बल सहा वेळा या मतदारसंघात विजय मिळवला. 2009 मध्ये त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता नारायण मानकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळेस स्नेहा दुबे यांचे वडील व अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांनी मानकर यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा 2014 आणि 19 मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र अपराजित असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना यंदाच्या निवडणुकीत 3200 मतांनी पराभूत करत स्नेहा दुबे या जायंट किलर ठरल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!