जम्मू-काश्मीरच्या पहलगाम शहरात दहशतवादी हल्ला झाला असून टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे.
दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन महाराष्ट्रीयन पर्यटकांची नावे आहेत. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पोलिसांचा वेश परिधान केला होता.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीनं श्रीनगरला रवाना