जे विमानात कधीही बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदेंनी आणले – खासदार नरेश म्हस्केंचे वादग्रस्त विधान

468 0

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरात अडकून पडलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी अगदी वादग्रस्त विधान केले आहे. जे लोक कधीच विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, अशी उपकाराची भाषा त्यांनी वापरली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मिरात अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने एक पथक पाठवले. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचले होते. त्यांनी पर्यटकांना परत आणण्याची सर्व व्यवस्था केली. त्याबाबत माहिती देताना खासदार म्हस्के यांची जीभ घसरली.

ते म्हणाले की, कोल्हापूर, केरळ, इशाळवाडी या दुर्घटनेत एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी पोहोचून मदत केली होती. शिंदे यांनी आता जे लोक कधीही विमानात बसले नव्हते, त्यांना विमानात बसवून आणले आहे. ४५ पर्यटक रेल्वेने पहलगामला गेले होते. गरीब लोक, त्यांच्या खाण्याचे वांदे होते. सीआरपीएफच्या कँपमध्ये ते लोक राहत होते. त्यांना शिंदे यांनी विमानतळावर आणले. ते पहिल्यांदाच विमानात बसल्याने ते घाबरले अशी मुक्ताफळे म्हस्के यांनी उधळली आहेत.

Share This News
error: Content is protected !!