केंद्रीय निवडणूक आयोगाची ‘ती’ एक घोषणा; अन् वाढलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन

107 0

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज राजधानी नवी दिल्ली पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्रात सोबतच झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी निवडणुकीची घोषणाही करण्यात आली असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी

पिपाणी चिन्ह गोठवण्यास निवडणूक आयोगाचा नकार

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन चिन्हांमध्ये मतदाराचा संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे आम्हाला फटका बसला असं म्हणत पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती.  केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावत पिपाणी चिन्ह गोठवण्यास नकार दिला आहे. मात्र EVM वर तुतारी वाजवणारा माणूस अधिक स्पष्ट दिसेल असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलेलं आहे

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!