राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं संभाजीराजे यांनी जाहीर केलं आहे. मात्र ही माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले
अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असं जाहीर केल्यानंतर पुढील वाटचाल खडतर आहे याची पूर्ण जाणीव होती. आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.
ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मला खासदारकी महत्वाची नसून जनता महत्त्वाची असल्याचं देखील संभाजीराजे यावेळी म्हणाले.