एममपीएससीनं नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक पध्दत २०२५ पासून लागू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातील बालगंधर्व चौकात सलग 4 दिवस आंदोलन केलं होतं
यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढाकार घेतला होता.
आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनाला बसलेल्या एमपीएससी परीक्षार्थींची शरद पवार यांनी भेट घेतली होती. शरद पवार रात्री ११ वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांच्या व्यथा-वेदना जाणून घेतल्या होत्या, त्यानंतर थेट आंदोलनस्थळावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून एमपीएससी विद्यार्थ्याची मागणी मान्य करण्याची विनंती केली होती. त्यानंतर एमपीएससी आयोगाकडून नवीन परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याची घोषणा केली
त्यामुळे आज पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले.