म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गट, मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
अखेर हिंदी भाषेचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची समिती गठित करण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द
राज्य सरकारकडून हिंदी भाषेत संदर्भात GR रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर पाच जुलै रोजी होणारा ठाकरे गटाचा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.