टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

386 0

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे.

पालघर येथील चारोटी जवळ सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीचा भीषण अपघात झाला.

रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालक म्हणून दाखल झाले.

 

सायरस मिस्त्री यांचा अल्पपरिचय 

  • सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी प्रमुख होते.
  • टाटा समूहाच्या 144 वर्षांच्या इतिहासात हे पद सांभाळणारे ते सहावे व्यक्ती बनले होते. तसंच टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी मिस्त्री यांच्या रुपात मिळाली होती.
  • सायरस मिस्त्री यांच्या नावाची रतन टाटा यांनी घोषणा केली त्यावेळी सायरस यांच्या नावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारण टाटा समूहाच्या बाहेर त्यांना सार्वजनिक जीवनात फारसं ओळखलं जात नव्हतं.
  • अखेर रतन टाटा यांच्यासोबतच्या वादानंतर त्यांना टाटा समूहाच्या प्रमुखपदावरून दूरही करण्यात आलं होतं.
  • सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!