गेल्या काही दिवसांपासून राज्यात वर्तमानातले विषय सोडून भूतकाळातल्या विषयांवर जास्त चर्चा आणि वाद विवाद होताना दिसत आहेत. छत्रपती संभाजी नगर मध्ये असलेली मुघल बादशहा औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहेत. या कबरीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. तर आता या वादात थेट मुघलांच्या वंशजाची एन्ट्री झाली आहे. भारतातच राहणारे मुघलांचे वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी हे मुघलांचे वंशज आणि शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जाफर यांचा पणतू असल्याचा दावा करतात. ते हैदराबादमध्ये रहात असून व्यावसायिक असल्याचं सांगितलं जातं. ते मुघल बादशहा बाबर यांचे थेट वंशज असून भारतातील मुघल संपत्तीचे वारसदार असल्याचा दावा करतात. प्रिन्स याकूब हे अनेकदा धार्मिक प्रकरणांमध्ये स्वतःचं मत मांडताना दिसतात. आणि त्याच पद्धतीने त्यांनी आता औरंगजेबाच्या कबरीच्या प्रकरणांमध्ये उडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस आयुक्तांना उद्देशून पत्र पहिल्याच समोर आलो आहे. या पत्रात ते म्हणतात, ‘माझे पूर्वज बादशहा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साध्या स्वरूपात आहे. मात्र काही दिवसांपासून काही लोक ही कबर हटवण्याची मागणी करत आहेत. औरंगजेबाचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मृत्यू पावले. त्यामुळे भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. सध्या ही कबर वक्फ बोर्डची संपत्ती असून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. काही लोक इतिहासाची मोडतोड करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रयत्न सरकारने हाणून पाडायला हवेत. मी माननीय राष्ट्रपतींच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, मी औरंगजेबाची कबर असलेल्या जागेचा मुतवल्ली अर्थात वक्फ त्या संपत्तीचा प्रमुख आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने या संपत्तीचे रक्षण करावं. तसेच आदेशही संबंधित यंत्रणा द्यावेत’
प्रिन्स याकूब यांनी याच आशयाची एक पोस्टही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर केली आहे. तर त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर देखील आक्षेप नोंदवला असल्याचं सांगितलं जात आहे. छावा चित्रपटा मुळेच औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून आला आहे त्यामुळे आपण दिग्दर्शक आणि निर्मात्यां विरोधात याची का दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितल आहे. त्यामुळेच प्रिन्स याकूब यांची एन्ट्री झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. तर सरकार या प्रकरणात आता काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.