राज्यात ग्रामपंचायतच्या 2369 जागांसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली होती या ग्रामपंचायतीत निवडणुकांचे आज मतमोजणी होत असून या ग्रामपंचायतींमध्ये महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय.
. 651 ग्रामपंचायतचे निकाल आतापर्यंत हाती आले असून यापैकी 161 जागांवर भाजपा विजयी झाला असून शिंदे गटाला 81 अजित पवार गटाला 113 शरद पवार गटाला 43 काँग्रेसला 52 तर ठाकरे गटाला 28 जागा मिळाल्या आहेत…
बीआरएसनं महाराष्ट्रात खाते खोललं
भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आपली पाळमुळं व्हायला सुरुवात केली असतानाच भंडाऱ्यामधील गोदरी या ग्रामपंचायतीवर बी आर एस ची एक हाती सत्ता आली आहे