‘आम्ही तुमच्या सोबत’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत उध्दव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना धीर

214 0

मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यानं ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे .

या अतिवृष्टीग्रस्त भागात उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी दौरा केला असून या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.तर धीर सोडू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू यात असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

नुकसानग्रस्त भागात पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचे सुद्धा सांगितले. तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा, अशी कैफियत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!