माॅन्सून नियोजन : वाढत्या उष्णतेच्या पाऱ्यामुळे पावसाळ्याचे आगमन यावेळेस पाच दिवस आधीच होण्याची शक्यता हवामान विभागणी वर्तवली आहे.

पावसाळ्याचे आगमन यंदा ५ दिवस आधीच

329 0

वाढत्या उष्णतेच्या पाऱ्यामुळे पावसाळ्याचे आगमन यावेळेस पाच दिवस आधीच होण्याची शक्यता हवामान विभागणी वर्तवली आहे. गेल्या चार ते पाच दिवसात हवामानात खूप काही बदल झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढल्यामुळे यंदा पावसाला उभारी येण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या हालचाली अंदमान मध्ये दिसण्यास सुरू झाला आहेत. पूर्ण अवकाश आभाळाने भरून गेले आहे म्हणून हवामान विभागाने यावेळेस चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवेचा दाब, समुद्राचे तापमान आणि वाऱ्याची दिशा त्यांचे संकेत देत आहेत. यंदा माॅन्सून नियोजन वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. यावेळेस फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उन जास्त आणि थंडी कमी अशी स्थिती होती. सुमारे शंभर वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला.आणि सलग मार्च आणि एप्रिल मध्येही तीच स्थिती आहे. मार्च मध्ये उष्णतेचा सरासरी पारा ४० अशांवर गेला आणि सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्णच ठरला. एप्रिल ही उष्णतेच्या लाटांनी सुरू झाला. यंदाचे उष्णतेचे प्रमाण जास्तीच आहे परंतु ही उष्णता यंदाच्या मॉन्सूनसाठी अतिशय फायद्याचे ठरत आहे. या उष्णतेमुळे बाष्पीभवन होण्यास सहायता होत आहे. मी सॅटॅलाइट इमेज मधून पाहिले असता मॉन्सूनची सुरुवात यंदा जलद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व यंदा अवेळी पाऊस झालं तू या उष्णतेमुळे झाला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे .ढगांची निर्मिती वेगाने होत असून ते सॅटॅलाइट इमेज मधून पाहिले असता असे लक्षात येते की मॉन्सून आपल्या तयारीला लागला आहे .संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे त्यामुळे मॉन्सून पूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

मेहुल चोक्सी अखेर पोलिसांच्या ताब्यात!

हवेचे दाब , समुद्राचे तापमान:

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वाऱ्याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान ३१, तर हिंदी महासागराचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर १००५ ते १०१० हेक्टा पास्कल इतके आहेत. देशात हवेचे दाब १००५ ते १००८ दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की, वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाईट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वाऱ्याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!