महसूलमंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ; ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरु होणार शेतकरी लाँग मार्च

704 0

राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आपल्या विविध मागण्यासांठी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी येथील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयापर्यंत पायी चालणार आहेत.

सरकार येऊन नऊ महिने उलटले तरी काहीच होत नाही. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.

याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा किसान सभेने एल्गार पुकारला आहे. किसान सभेच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा 26 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत चालणार आहे. डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत पायी मोर्चात सहभागी होणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!