Jitendra Awhad acquitted: पुणे येथील एका विशेष खासदार/आमदार न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल आणि हल्ला यांसारख्या (Jitendra Awhad acquitted) आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण २३ मार्च २०१६ रोजी फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या राजकीय संघर्षाशी संबंधित होते.
हे प्रकरण फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या वादामुळे सुरू झाले होते. एका बाजूला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ‘जेएनयूचे सत्य’ या नावाचा कार्यक्रम (Jitendra Awhad acquitted) आयोजित करत होते. दुसऱ्या बाजूला रोहित वेमुला (जानेवारी २०१६ मध्ये आत्महत्या केलेले दलित पीएचडी स्कॉलर, ज्यांच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांना पाठिंबा देणारे आंबेडकरवादी आणि डाव्या विचारांचे विद्यार्थी आंदोलन करत होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दलित विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३ मार्च रोजी कॅम्पसला भेट दिली होती.
याआधी, २२ ऑगस्ट रोजी एका दंडाधिकारी न्यायालयाने आव्हाड यांची दोषमुक्तता करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयात धाव घेतली.
BABY DELIVERED ON RAILWAY PLATFORM MUMBAI FULL STORY विकास बेद्रे यांनी सांगितला प्रसूतीचा प्रसंग
न्यायाधीश गांधी यांनी १३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील प्रत्येक आरोपाचे पुनरावलोकन करताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. “प्रथमदर्शनी, अर्जदारावर लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. (Jitendra Awhad acquitted) त्यांची दोषमुक्तता होणे बंधनकारक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आधीचा आदेश आणि त्यामधील त्रुटींवर बोट ठेवत ते पुढे म्हणाले, “मा. दंडाधिकारी यांनी पुराव्याचे योग्य आकलन केलेले नाही.”
पोलिसांनी आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ बेकायदेशीर जमाव जमवणे, १४७ आणि १४९ दंगल, ३२३ दुखापत करणे, ३३६ जीव किंवा सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्ये आणि ३४१ गैरकृत्ये करून प्रतिबंध करणे, यानुसार गुन्हे दाखल केले होते.
KALYANI NAGAR DOG NEWS: पेटशॉपच्या निष्काळजीपणा मुळे गेला श्वानाचा बळी
आव्हाड यांचे वकील हर्षद निंबाळकर आणि शिवम निंबाळकर यांनी युक्तिवाद केला की, कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्तता याचिका फेटाळल्यामुळे त्यांच्या अशिलाला अनावश्यकपणे खटल्याला सामोरे (Jitendra Awhad acquitted) जावे लागले. आव्हाड यांनी त्या कार्यक्रमात कोणतेही भाषण केले नव्हते, तसेच त्यांच्यावर हिंसेचा कोणताही आरोप सिद्ध होत नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. याउलट, आव्हाड हे स्वतः दगडफेकीचे बळी ठरले होते, असे वकिलांनी नमूद केले.
सरकारी पक्षाने आव्हाड यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आणि ते बेकायदेशीर जमावाने केलेल्या कृत्यांसाठी जबाबदार आहेत, असा युक्तिवाद केला. तथापि, न्यायालयाने हे दावे फेटाळले. आव्हाड २२ मार्च रोजी कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांचा कोणत्याही विद्यार्थी गटाच्या हालचालींमध्ये सहभाग नव्हता, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच, चार्जशीटमध्ये त्यांना कोणालाही हानी पोहोचवल्याबद्दल दोषी ठरवणारे कोणतेही पुरावे नव्हते.
विशेष न्यायालयाच्या या निकालानंतर, २०१६ च्या फर्ग्युसन कॉलेज घटनेशी संबंधित सर्व आरोपांमधून जितेंद्र आव्हाड यांची औपचारिकपणे मुक्तता झाली आहे.