Navale Bridge Accident Pune: मुंबई-बंगळूरु महामार्गावरील सतत अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नवले पुलावर बुधवारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. यावेळी (Navale Bridge Accident Pune) सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या गाडीने हा अपघात झाला. पुणे-बंगळूरु महामार्गावर, वडगाव येथील एका हॉटेलजवळ गौतमी पाटील यांच्या कारने एका रिक्षाला धडक दिली, ज्यात रिक्षा चालक धरून तीन जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत उपस्थित नव्हत्या.
या घटनेमुळे पुन्हा एकदा कात्रज बोगदा आणि वडगाव पूल दरम्यानच्या सुमारे चार किलोमीटरच्या पट्ट्यातील अपघातांच्या वाढत्या संख्येवर प्रकाश पडला आहे. या धोकादायक पट्ट्यात इतके अपघात का होतात, असा प्रश्न परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांकडून वारंवार विचारला जात आहे.
Aratai Chat App: व्हाट्सअप ला टक्कर देणार आराताई ॲप
नवले पूल ‘धोकादायक क्षेत्र’ का आहे?
वाहतूक तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिक यामागची अनेक कारणे नमूद करतात:
* तीव्र उतार: पुलावरून खाली उतरताना वाहनांना अचानक ब्रेक लावणे खूप कठीण होते, ज्यामुळे अनेकदा मागून धडक बसतात.
* सेवा रस्त्यांचा अभाव: सेवा मार्ग नसल्यामुळे दुचाकींपासून ते अवजड ट्रकपर्यंत सर्व वाहनांना मुख्य महामार्ग शेअर करावा लागतो. यामुळे (Navale Bridge Accident Pune) वाहतूक कोंडी वाढते आणि अपघातांचा धोका कैकपटीने वाढतो.
* अवजड वाहनांच्या चालकांची पद्धत: इंधन वाचवण्यासाठी अनेक ट्रक चालक उतारावर गाडी न्यूट्रल गिअरमध्ये टाकतात. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक लावण्याची त्यांची क्षमता कमी होते.
* दोषपूर्ण पायाभूत सुविधा: अपुरे क्रॅश बॅरिअर्स, सूचना फलकांचा अभाव, पादचारी मार्गांची कमतरता आणि ओव्हरब्रिज नसणे यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते.
* २४x७ अवजड वाहतूक: दक्षिणेकडील राज्यांतून मुंबईकडे जाणारी मालवाहतूक याच मार्गाचा वापर करते, ज्यामुळे रस्त्यावर नेहमीच मोठा ताण असतो.
AMBEDKAR BROTHER TOGETHER: ठाकरे बंधूंप्रमाणे आंबेडकर बंधूही एकत्र येणार?
अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी काय करता येईल?
नऱ्हे पुलावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही तातूद् उपाययोजना सुचवल्या आहेत:
* उताराची तीव्रता कमी करणे: पुलाच्या उताराची तीक्ष्णता कमी करण्याची गरज आहे.
* सेवा रस्त्यांचे बांधकाम: नवले पूल आणि वडगाव पूल दरम्यान त्वरित योग्य सेवा रस्त्यांचे बांधकाम करणे.
* सुरक्षितता उपाययोजना: सुरक्षा बॅरिअर्स, स्पष्ट सूचना फलक आणि पादचारी क्रॉसिंग्ज बसवणे.
* अवजड वाहनांवर नियमन: अवजड वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण आणणे आणि चालकांनी उतारावर न्यूट्रल मोडचा वापर करण्यापासून (Navale Bridge Accident Pune) परावृत्त करणे.
* कठोर शिस्त: वाहन मालकांमध्ये कठोर शिस्त लागू करणे, जेणेकरून ते उतारावर गाडी उभी करणार नाहीत.
DEEPFACKE DITECTION TOOL: हे भारतीय फेक इमेज डिटेक्शन टूल माहिती आहे का?
नवले पुलावर अपघात ही एक नियमित घटना बनली आहे. यामुळे रस्ते अभियांत्रिकी, नियमांची अंमलबजावणी, आणि वाहन चालकांचे वर्तन या तिन्ही स्तरांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने काही सुरक्षा उपायांची केवळ मांडणी केली असली तरी, प्रवाशांचे म्हणणे आहे की त्यांची अंमलबजावणी मात्र पुरेशी झालेली नाही. या अपघातांची मालिका कधी थांबणार, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.