JANSURKSHA VIDHEYAK: सार्वजनिक सुरक्षेसंदर्भात पारित केलेले
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा
DR KUMAR SAPTARSHI INTERVIEW ON JANSURKSHA VIDHEYAK: ‘जनसुरक्षा विधेयक संविधान विरोधी’
भाजप सरकारने मंजूर केलेले महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक हे
जनतेच्या लोकशाही अधिकारांवर एक मोठा हल्ला आहे.
अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या शक्तींशी लढण्याच्या नावाखाली, मतभेद व्यक्त करणाऱ्या सर्व व्यक्तींना सार्वजनिक सुरक्षितता
आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका म्हणून चित्रित करण्याचा या विधेयकाचा हेतू आहे.
किसान लाँग मार्च: शेतकरी मागण्यांच्या समितीतून शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना वगळलं
या विधेयकात जाणूनबुजून अतिरेकी डाव्या विचारसरणीच्या शक्ती आणि तत्सम संघटनांची व्याख्या अस्पष्ट ठेवली आहे.
यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध दडपण्यासाठी सरकारला पुरेसा वाव मिळणार आहे.
विधेयकातील कठोर तरतुदींचा वापर मतभेद रोखण्यासाठी आणि
राजकीय विरोकांना गप्प करण्यासाठी केला जाण्याचा धोका उघड आहे.
माकप सर्व राजकीय पक्षांना आणि लोकशाही शक्तींना या
हुकूमशाही विधेयकाचा निषेध करण्याचे आवाहन करते आणि ते
त्वरित रद्द करण्याची मागणी करते.