Electricity Bill Discount Maharashtra : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीजदर होणार कमी, काय होणार सर्वसामान्यांना फायदा?

149 0

Electricity Bill Discount Maharashtra : भरमसाठ वीज बिल भरून तुम्ही वैतागला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विजदर कमी होणार आहे. विशेष म्हणजे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचे आदेश दिले आहेत. नक्की काय आहे हा निर्णय? पाहूया सविस्तर….

राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणनं दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (Electricity Bill Discount Maharashtra) महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून घरगुती, औद्योगिक आणि व्यवसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात 26 टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार आहेत.

विमानतळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई, तीन लाख रुपये किंमतीचा १२ किलो गांजा जप्त

राज्यात 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरण्याचे प्रमाण 70% इतके आहे. त्यांच्यासाठी जुलैपासून 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. 100 पासून 500 युनिट पर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना एक जुलैपासून वाढीव दराने विजेचे बिल भरावे लागणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना होणार आहे. म्हणजेच दररोज तुम्ही विजेची बचत केली आणि 100 युनिट पेक्षा वीज कमी वापरली गेली तर 10 टक्के दर कमी होतील.

आयोगाने दिलेल्या निर्णयातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी 10 टक्के अतिरिक्त सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन अशी आयोगाच्या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत.

दुसरीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात HP पर्यंत पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. वीज दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना 2.0 महत्वपूर्ण ठरत आहे.

शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी अंमलात येणाऱ्या या योजनेत विकेंद्रीत स्वरूपात सौर ऊर्जेद्वारे वीज तयार करून त्यावर पंप चालवण्यात येणार आहेत. या योजनेची क्षमता 16000 मेघावॅट इतकी असून त्या माध्यमातून सरासरी 3 रुपये प्रति युनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होणार आहे. डिसेंबर 2026 पर्यंत योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे.

TOP NEWS MARATHI : ‘महिला पोलिसही सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांचं काय ?’
पुण्यातील महिला कार्यकर्त्यांचं कोंढरेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

वीजदर कपातीचं कारण

महावितरणने विजेची गरज लक्षात घेऊन रिसोर्स एडेक्वसी प्लॅन तयार केला असून त्यानुसार 2030 पर्यंत राज्याची विजेची क्षमता 81,000 मेगाव्हॅट होण्यासाठी 45000 मेगाव्हॅट चे वीज खरेदी करार करण्यात आले आहेत. त्यापैकी 31 हजार मेगावॅट रिन्यूएबल म्हणजेच नवनिकरणीय ऊर्जास्त्रोतांमधून मिळणार आहे. ही वीज अत्यंत किफायतशीर दरात मिळणार असल्यामुळे आगामी 5 वर्षात महावितरण वीज खरेदीचे 66 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. म्हणूनच महावितरणला वीज दर कपातीचा प्रस्ताव मांडता आला आणि आयोगानेही त्यानुसार आदेश दिला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिलेला हा निर्णय सामान्य वीज ग्राहकांसाठी सुद्धा अतिशय दिलासादायक ठरलेला असून औद्योगिक आणि व्यवसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या फायद्याचा ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!