PUNE PANSHET POLICE CASE : पुण्यात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे.
अगदी किरकोळ कारणावरून थेट अमानुष खूनाच्या घटना समोर येत आहेत.
शातच केवळ सिगारेट ओढताना हटकल्याने एका तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय.
TOP NEWS MARATHI | PUNE PANSHET POLICE CASE : पानशेतमधील तरुणाच्या हत्येचं गूढ उलगडलं
आकाश भिसे, भागवत आसुरी, रितेश जोगदंड, रमेश शेळके आणि पांडुरंग सोनवणे हे तरुण पुण्यातील नर्हे परिसरात
अनेक दिवसांपासून (PUNE PANSHET POLICE CASE) वास्तव्यास आहेत. हे पाचही जण मूळचे परभणीचे आहेत.
पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाई मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांवर फिरताना दिसून येते. त्याच पद्धतीने हे पाच तरुणही पानशेत परिसरात पर्यटनासाठी गेले होते.
15 जून रोजी पानशेत येथील नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर हे तरुण उभे होते. त्यांच्यातील काहीजण सिगारेट ओढत होते.
ही गोष्ट खटकल्याने तेथील स्थानिक नागरिक असलेल्या रोहिदास काटकर यांनी या तरुणांना येथे उभा राहून सिगारेट ओढू नका असं सांगितलं.
मात्र हे या तरुणांना आवडलं नाही. त्यांनी रोहिदास यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यातूनच या तरुणांमध्ये आणि रोहिदास यांच्यात बाचाबाची झाली.
त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. या पास तरुणांनी मिळून रोहिदास यांना बेदम मारहाण केली. निर्जन स्थळी नेऊन त्यांच्या छातीवर मोठा दगड मारला.
यामध्ये रोहिदासचा जागीच मृत्यू झाला होता. मृतदेह तिथेच फेकून हे तरुण घटनास्थळावरून पसार झाले.
Maharashtra Rain Alert : राज्यातील 5 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट ; राज्यभरातील पावसाचा आढावा
हा मृतदेह आढळून घेताच पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध सुरू केला.
अनेक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचे माध्यमातून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलं
आणि अखेर या पाचही जणांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
TUKARAM MAHARAJ PALKHI PRASTHAN:विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अगदी किरकोळ कारणावरून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण (PUNE PANSHET POLICE CASE) वाढलंय.
तशाच पद्धतीने पुण्यातील ही हत्या देखील करण्यात आली. केवळ सिगरेट ओढण्यावरून सुरू झालेल्या वादाने एकाचा बळी घेतला.
विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी हे 22 पेक्षा कमी वयोगटातले आहेत.
त्यामुळे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्या तरुणांकडून आणि विशेषतः अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांना रोखणं पोलिसां पुढचं आव्हान बनलं आहे.