PURANDAR INTERNATIONAL AIRPORT पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे याच पार्श्वभूमीवर विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे सुरू होता यावेळी पोलिस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हिंसक आंदोलनात आंदोलनात झालं, नेमकं पुरंदरमध्ये काय घडलं? (PURANDAR INTERNATIONAL AIRPORT)
पाहुयात…
2014 ते 2019 मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना पुरंदर मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ निश्चित करण्यात आलं. यासाठी पुरंदर मधील सात गावांचीदेखील निश्चिती करण्यात आली. पुढे राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या विमानतळाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. याच काळात पुरंदर विमानतळाच्या चर्चा काहीशा थंड झाल्या होत्या. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा सरकार आल्यानंतर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चर्चांनी जोर पकडला असून भूसंपादनासाठी उद्योग विभागाने अधिसूचना देखील काढली.
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावातील तब्बल 2832 हेक्टर जमीन अधिगृहीत करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सर्वे करण्यासाठी शासनाकडून ड्रोन ची मदत घेण्यात येते मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र या विमानतळाला विरोध होत आहे शनिवारी देखील ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाचा पथक आलं होतं
यावेळी पोलिस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली यावेळी पोलिसांच्या दोन गाड्यांवरही आंदोलकांनी दगडफेक केली यामध्ये चार पोलीस अधिकारी व 20 पोलीस अंमलदार जखमी झालेत पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. या सर्वेच्या भीतीने कुंभारवळण गावातील एका 87 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असा दावाही आंदोलन शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. (PURANDAR INTERNATIONAL AIRPORT)
दरम्यानच्या 87 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला त्या 15 दिवसांपासून ती महिला अत्यवस्थ होती. या महिलेचा प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कोणताही सहभाग दिसून येत नाही. गेल्या दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये सहभागी नाही अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. तर आता स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सर्वेक्षण थांबवण्याचेच आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट
Chandrashekhar Bawankule: योजना चालवण्यासाठी थोडा निधी घेतल्यास हरकत नाही