मुंबई : महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही मनाचा मोठेपणा दाखवून एकत्र येत असतील, तर ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, एखादे कुटुंब एकत्र येत असेल आणि राज्याचे भले होणार असेल तर कोणीही त्याचे स्वागतच करील. मतभेद असले पाहिजे, पण मनभेद असू नये. तसेच राज आणि उद्धव दोघेही माझ्याहून मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांना कसा सल्ला देणार? असा सवाल त्यांनी केला.
महायुती सरकारचा महाल सगळ्या महिलांच्या अश्रूवर उभा असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्र दिन साजरा करताना राज्याची आर्थिक स्थिती, शिक्षण, शेतकरी, पाणी या विषयांवर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. सरकारकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत. मात्र, कोणीतरी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. आमच्यावर विश्वास दाखवला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी येत्या जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जातीय जनगणनाची मागणी आपण केली होती. उशिरा का होईना केंद्र सरकारने ती मान्य केली. त्यामुळे या निर्णयाचे मनापासून स्वागत करते. संसदेत महिला आरक्षण विधेयक आम्ही पारित केले आहे. या सर्व गोष्टी २०२५ -२६ पर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मे महिन्यात वन नेशन वन इलेक्शनसह इन्कम टॅक्स नवीन कायदा होत आहे. या दोन्ही समितीवर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर
STATE CABINET DECISION: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते झाले मोठे निर्णय?
RAJ THACKERAY: मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको- राज ठाकरे