https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/04/fk9m2hro_sanjay-raut-pti_625x300_15_February_22.jpg

विखे पाटलांच्या भ्रष्टाचाराला फडणवीसांचे अभय – संजय राऊत

331 0

मुंबई : राज्यातील १० हजार शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज आणि कर्जमाफी दिल्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RADHAKRUSHNA VIKHE PATIL) यांना अभय देत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (SANJAY RAUT) यांनी केला आहे. विखे पाटील यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राऊत म्हणाले की, १० हजार शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज आणि कर्जमाफी दिल्याचा प्रकार तीन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी माझे डोके ठिकाणावर नाही, असे म्हटले होते. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे डोके ठिकाणावर नाही, असे मुख्यमंत्री म्हणतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बोगस कर्जवाटप आणि कर्जमाफी दिल्याच्या प्रकरणात २००४ ते २००६ या गळित हंगामात शेतकऱ्यांच्या नावाने बेसल डोससाठी कर्ज काढून भ्रष्टाचार करण्यात आला होता. याप्रकरणी लोणी बुद्रुक येथील बाळासाहेब केरू विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विखे पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे पाटील यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यसरकारमध्ये भ्रष्ट मंत्री असतील तर स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार या विषयावर गप्पा मारून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सल्ले देऊ नये, अशी सुचना त्यांनी केली. विखे पाटील यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेईपर्यंत हा विषय लावून धरणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

DEVENDRA FADANVIS| ‘राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ’

POLITICS| शरद पवारांचे खासदार अजित पवारांसोबत जाणार? सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेल यांना फोन; दिल्लीच्या राजकारणात काय घडतंय?

Share This News
error: Content is protected !!