मुंबई : देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळे महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. बावनकुळेंच्या या विधानावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून प्रतिक्रिया उमटली आहे.
बावनकुळे यांनी चंद्रपूरच्या वरोरा येथे भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा दावा केला होता. फडणवीस हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्याशिवाय विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, असे बावनकुळे म्हणाले होते.
बावनकुळे यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर शिंदे यांनी ‘हात जोडत’ काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यावर भाजपला उपरोधिक टोला हाणला आहे. फडणवीस २०३४ पर्यंतच कशाला त्यांना २०८० पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू द्या, असे त्यांनी म्हटले आहे.
फडणवीस मुख्यमंत्री पदावर असण्याला आमची काहीच हरकत नाही. त्यांना आमच्या कायम शुभेच्छा आहेत. आम्ही सर्व एकच आहोत. कुणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्यात मतभेद होणार नाहीत, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
BJP STATE GOVERNMENT: महाराष्ट्रासह या राज्यात आहेत भाजपाचे मुख्यमंत्री
#INFORMATIVE : वारसा प्रमाणपत्र म्हणजे काय ? नॉमिनी आणि वारसदारातील फरक,जाणून घ्या हि माहिती