मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी बळींना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता की नाही, याची कोणतीही ठोस माहिती नाही, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमख यांनी केले आहे.
ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी बळींना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता की नाही, याबाबत निश्चित माहिती नाही. हे सत्य केवळ तपासातूनच उघड होऊ शकते. ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराविरुद्ध सरकार कठोर कारवाई करीत आहे. सिंधू करार रद्द करून सरकारने खूप चांगले पाऊल उचलले असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं