मुंबई : धर्म विचारून त्यांनी पर्यटकांवर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, धर्माच्या नावावर अशाप्रकारचे कृत्य करणारे लोक इस्लामला मानणारे असूच शकत नाहीत. त्यांची कृत्ये अशीच सुरू राहिल्यास त्यांना इस्लाममधून काढले जाईल. जम्मू काश्मिरात सरकारने एवढी सुरक्षा व्यवस्था केली होती तर मग हल्ला कसा झाला? असा सवाल त्यांनी केला. आता अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे, त्याचवेळी हा हल्ला झाला. तिथे जाणाऱ्या लोकांची जबाबदारी ही सरकारची राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.