उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशहा ; आशिष शेलार यांचा आरोप

230 0

मुंबई : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा असून त्यांच्या डोक्यात सदा न कदा केवळ घोटाळ्यांचेच विचार येतात, असा आरोप भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबईतील गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक वर्षे सत्ता होती. सद्यस्थितीत मुंबईतील एक चौरस फुट क्षेत्रफळाच्या जागेला लाखोंची किंमत आहे. ठाकरे यांनी मुंबई महापालिका ताब्यात असताना १ कोटी चौरस फूट क्षेत्र बिल्डरांच्या घशात फुकट घातले. त्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.

मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे ते बादशहा आहेत. त्यांच्या डोक्यात सतत लँड व लँड स्कॅमचे विचार येतात. त्यांनी सध्या काही नवीन बोलणेच सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अंबानीला दिली, ती जमीन अदानीला दिली असेच बोलत राहतात.
वक्फ कायद्याबद्दल खोटी व चुकीची माहिती पसरवली जात आहे. वक्फ बोर्ड तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार असे ते सांगत आहेत.

मात्र, या देशात कायदा आहे. त्यामुळे तसे काहीही करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी म्हटले.

Share This News
error: Content is protected !!