मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला चोरांनी सांगण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर हल्ला चढवला आहे. आपल्याला लाज वाटत असेल तर स्वतःच्या वडिलांचे फोटो लावावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची मोठी लायकी नाही. कुणाल कामराने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. आम्हीच नाही तर त्यांच्याच खासदारांनी त्यांना साप म्हटले आहे.
आगामी काळात बिहार व मुंबई महापालिकेची निवडणूक असल्यानेच हिंदी भाषेचा विषय समोर आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही मराठीचा विषय काढा, आम्ही हिंदीचा विषय घेतो, असे त्यांचे ठरलेले दिसते. मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे, आणि ती सक्तीची असायलाच हवी, असे आमचे मत आहे. मात्र, पहिलीपासून तीन भाषा शिकवणे हा मुलांवर दबाव टाकत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील पाण्याच्या
समस्येबाबत ठाकरे यांनी राज्यसरकारला दोषी ठरवले आहे. धरण बांधण्यासाठी सरकारने पाच लाख झाडे तोडण्याचा त्याला आमचा विरोध आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी सोडवला नसल्याचे त्यांनी म्हटले.