कृषी क्षेत्रात AI चा वापर

कृषी क्षेत्रात AI चा वापर

3712 0

राज्यातील 55% हून अधिक लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र सातत्याने बदलणारे हवामान तसेच रोगराई,शेतमालास हमीभाव न मिळणे अशा विविध कारणांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वाढत्या घटना, पाऊस, दुष्काळ, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव असे विविध आपत्तींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी आणि कृषी विभागासमोर पीक उत्पादन टिकवण्यासाठी मोठे आव्हान आहे.

यासाठी राज्याच्या कृषी विभागातर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित राज्याचे कृषी धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणाचे राज्यभरात लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेतीचे नुकसान टाळण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी करून, कमी भांडवलात जास्त पिकांची निर्मिती अशा प्रकारे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सोबतच तंत्रज्ञान आणि माहितीच्या आधारे आधुनिक शेतीसाठी याचा आधार घेतला जाणार आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून शेतमालाच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बारामती येथे उस शेतीमध्ये ‘एआय’ च्या वापराचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

हवामानाचा अंदाज, कोणते पीक घेणे योग्य राहील, पिकाला कोणत्या भागात खत आणि पाण्याची आवश्यकता आहे, कीड किंवा रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पिकावर औषध फवारणी, कोणते पीक काढणीला आले आहे, बाजारातील दर अशा विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल, या पद्धतीने ‘एआय’ चा शेतीमध्ये वापर वाढवण्यात येणार आहे.

– विनयकुमार आवटे, कृषी संचालक

Share This News
error: Content is protected !!