अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत सुरु आहे. या ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी धक्कादायक विधान केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असा मोठा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीजवर एक पद मिळत होते, प्रत्येक सभेला ठाण्यात माणसे येत होती. त्यांची लोक संपूर्ण तयारी करत होते. आता उद्धव ठाकरे गटाचे लोकही समोर नाही. २०१४ नंतर काही गोष्टी बदलल्या गेल्या. काही लोकांना सातत्याने घेणे सुरु झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष संघटनेवर लक्ष होते. त्यानंतर ते राहिले नाही. लोकांना भेटले गेले पाहिजे. ते होत नव्हते. मी काहीच दिले नाही. मला एक रुपया पक्षाने मागितले नाही. त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऋणी आहे. माझ्यासारखे अपवाद सोडले तर या गोष्टी घडत होत्या. व्यक्ती म्हणून उद्धव साहेब संस्कृत नेते आहे. परंतु त्यांना वेळेचे नियोजन करता आले नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान आता मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाचा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अत्यंत गंभीर प्रहार केला आहे. आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी गोऱ्हे यांना सुनावलं. मुळात एक नंबरची ही खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या लायकीची नाही. सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि सतत बोलायची थांबावं लागेल, तू होतीस कोण आणि तू करतेस काय? असा प्रहारही त्यांनी केला. महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केलं नाही. किशोरी पेडणेकर आपल्या कार्यक्रमाचा एक साडीचा किस्सा सांगितला. पेडणेकर म्हणाल्या की मी एका कार्यक्रमासाठी बोलावलं तर माझ्याकडे साडी मागितली. मी दिली तर मला ती परत केली. मला ही साडी पाहिजे, अशी साडी पाहिजे असं सगळं होतं अशी टीका त्यांनी केली. पेडणेकर पुढे म्हणाल्या की तीन वेळा आमदार दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावं. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला गेला तर साहित्यिकांच्या कार्यक्रमाला गेला. समाजाला दिशा देणारी माणसं म्हणजे साहित्यिक असतात. मात्र, बाई जाऊन बरळल्याचे पेडणेकर म्हणाल्या. या नालायक बाईला काय म्हणायचं असा हल्लाबोल ही किशोरी पेडणेकर यांनी केला.