22 दिवसांपासून ज्या वाल्मीक कराडला पकडण्याची सर्व नेते, पोलीस आणि सर्वसामान्य जनता ही वाट पाहत होते, तोच वाल्मीक कराड आज स्वतः सीआयडी समोर शरण आला. पुणे सीआयडीच्या मुख्यालयात कराडची तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली. मात्र या सगळ्या नंतर आता वाल्मीक कराड ( valmik Karad ) याला जामीन (bail) मिळणार का ? आणि जामीन कधी मिळेल ? प्रश्न आहेत. त्यामुळे वाल्मीक कराडसाठी जामिनाची प्रक्रिया आता कशी असणार आहे, जाणून घेऊया.
9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोन कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा या हत्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला. आधी बीडचे पोलीस आणि नंतर सीआयडीचं पथक वाल्मीक कराडचा शोध घेत होतं. हा शोध अखेर थांबला कारण वाल्मीक कराड स्वतः सीआयडी ला शरण आला. मात्र यामुळे वाल्मीक कराडला जामीन मिळण्याची शक्यता वाढली आहे.
कायदा काय सांगतो ?
एखादा फरार गुन्हेगार ज्या वेळी शरण येतो तेव्हा या गोष्टीचा फायदा त्याला जामीन मिळवताना होवू शकतो. ‘मला पोलीस शोधत होते. मात्र मी पोलिसांना सापडलो नाही. तरीही मी स्वतः शरण आलो आहे. मी कुठेही पळून गेलो नाही. त्यामुळे जामीन देताना माझा विचार केला जावा’, अशी बाजू आरोपीकडून मांडली जाऊ शकते. तो स्वतः शरण आल्याचा त्याला फायदा होऊ शकतो. यामुळे वाल्मीक कराडला जामीन मिळवताना त्याने स्वतः शरण येणं फायद्याचं ठरू शकतं