अंतरावली : राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्याची वाट पाहत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 25 जानेवारीला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारचे टेन्शन अजून वाढणार आहे.
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारला 25 जानेवारी पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.या तारखेच्या आता आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा सरकारला पश्चाताप होईल, असा इशारा देखील जरांगेंनी देवेंद्र फडणवीस सरकारला देण्यात आला आहे.
“मराठ्यांनी 25 जानेवारीला अंतरावली सराटीमध्ये येऊन उपोषण करायचे नसेल त्यांनीही यावे आणि पाठिंबा दाखवावा तसेच आता हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यावे यासाठी गावागावात बैठका घ्या, पत्रिका छापा आणि लोकांमध्ये वाटा. अशाप्रकारे अंतरवाली मधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठ्यांना निमंत्रण द्या आणि 25 जानेवारीला कुठलेही कार्यक्रम ठेऊ नका, लग्नाची तारीख काढू नका”,असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला करण्यात आला आहे.